Saturday, July 21, 2012

निवृति दिवशी...





वीरांगणे !! असे अश्रु तू ढाळू नको ...!

कुरुक्षेत्री तू अशी भावविभोर होऊ नको

पेरलेल्या तुझ्या स्वरांचे प्रतिसाद उमटतील वेळाने

अनुभवाचे बोल तुझे ठरतील प्रेरक जेत्याचे

गीतेचा उपदेश आमलात आणण्याचा

प्रयत्न तू केलास ..............!

पण ..........

पण श्रीकृश्नाचा मोलाचा सल्ला तेवढा विसरलात

सामंजस्य राखुन् टाळले असते संघर्ष ......

तर कुरुक्षेत्राचं युद्ध झालाच नसत

tumchya विचारांना सांगड़ घालून

मोल त्याच वाढल असत ...!

तरीही विरान्ग्न्ने अश्रु हेलो ढालू हेलो

कुरुक्षेत्री अशी भावविभोर होवू नको ....!

रंनागनी तुझा स्म्रुतिचा दीप एक तेवत राहिल

कधी कधी इतराना सुधा

तोच प्रकाश पुरवत राहिल



रेखा जगताप




च ट प टा - ल ज्ज त दा र ........

summer Roll-caTpTa lajjatdar

You Need:
         8-10 rice paper sheets,1-packet rice noddles,2-carrots, 3-boiled eggs,4-5 lettuce leaves, shredded cheese, 1/2" ginger, 2- garlic cloves, salt for test,warm water (for dipping the rice sheet): Tip: For variation you can use cooked  shrimps in this summer roll & for vegetarian people you can use Paneer cubes or slice cut in the heart shape. 


Preparation:
Step -1
First Boiled 1-cup of water and add the 1/4 tbsp salt, chopped ginger and garlic to it, then add the rice noodles and cook for 5-6 minutes.drain the noodles and keep aside, cut the boiled eggs with help of egg cutter, slice the carrots nicely thin and lettuces in stripes and keep aside.
Step-2


Now pour  warm water in the plate and dip the rice paper sheet for 10-20 seconds,then take out and place on plat surface careful as shown in the picture. then arrange the egg slice,carrots,sprinkle pinch of salt on it,then place the lettuce and cheese on it. then fold the side as shown and rap the roles with remaining rice sheet. ..It ready. 
Keep it in fridge for 1 hour before serving. 


 You can serve these summer rolls with tomato ketchup or sweet & sour sauce. 

Enjoy...........!!!!!!

अंतरंग: Preview "पति परदेश्वरा ....."

अंतरंग: Preview "पति परदेश्वरा ....."

Thursday, July 17, 2008

सरस्वती जननी

(कविते बदल थोडस-- स्वर्गीय श्रीमती सरस्वती वरधराजन-- आमच्या शालेच्या विश्वस्त याना श्रधांजली म्हणून ही कविता समर्पित आहें --(निधन १९-७ २००७ ) या कवितेत त्याचा मुलांच्या व नातू आंणि पति श्री वरधराजन यांच्या नावाचा उल्लेख आहें बालासुब्रमन्यम , विजय , यश )

सरस्वती जननी


स्वतेजाने आकाशी ती तळपत होती ज्वाला



आज अचानक त्या ज्योतीचा प्रकाश मावळला....!



विद्युलातेपरी तेजाने जरी तळपत होती बाला



परी हृदयी तिच्या वसत होता वात्सल्याचा प्याला



वादळे ती किती ही आली पण.. ,

वीरांगना ती लढत राहिली,

संसाराचया रथ चक्राची ,

धुरा तिने ही कधी सोडली



कर्तृत्वाच्या शिखरावरती पतिराजा चढविला



आज अचानक त्या ज्योतीचा प्रकाश मावळला...!



सरस्वती ती विद्यादायिनी लोभस मूर्ति मधुर भाषिणी



बालासुब्रता , विजयलक्ष्मी , वरदवादिनी यशोवार्धिनी



धार्मिक सात्विक अशी ही जननी ....!



शालीनतेचा कर्त्रुत्व्याचा पांघरला शेला



आज अचानक त्या ज्योतीचा प्रकाश मावळला



स्वतेजाने सोऊ ती तळपत होती ज्वाला



आज अचानक त्या ज्योतीचा प्रकाश मावळला ...!
REKHA JAGTAP

Sunday, July 6, 2008

साक्षरतेचा मंत्र

उंचवू उंच निशान अपुले ...!
उंचवू उंच निशान ...
होऊन साक्षर, राखू आपण भारतभूची शान
उंचवू उंच निशान अपुले
शिकता होईल सर्व ही सुखकर,
शिकतील महिला शिकतील बालक,
साक्षरतेच्या मंत्राचा या करुया जयजयकार ...!
उंचवू उंच निशान अपुले ......!

गाव असो वा असोत नगरी,
महल असो वा असो झोपडी,
साक्षरतेच्या या रोपाचा होईल वृक्ष विशाल,
उंचवू उंच निशान अपुले
उंचवू उंच निशान

नेईल वृक्ष हा प्रगति पथावर
सारे आपण होवू साक्षर
अभिमानाने उंचावेल मग भारत भूची मान
उंच निशान अपुले
उंचवू उंच निशान

सौ रेखा जगताप.
(साक्षरता अभियान प्रोजेक्ट करिता लिहिलेली कविता )

निवृति

वीरांगने ! असे अश्रु तू ढाळू नको !

कुरुक्षेत्री तू अशी भावविभोर होऊ नको !

पेरलेल्या तुझा स्वरांचे प्रतिसाद उमटतिल वेळाने

अनुभवाचे बोल तुझे ठरतील प्रेरक जेत्याचे

गीतेचा उपदेश आमलात आणण्याचा

प्रयत्न तू केलास ....

पण .........

पण श्रीकृषणाचा मोलाचा सल्ला तेवढा विसरलात

सामंजस्य राखून टाळले असते संघर्ष

...तर कुरुक्षेत्राच युद्ध झालच नसतं

तुमच्या विचारांना सांगड़ घालून मोल त्याच वाढलं असतं

तरीही, वीरंगाने अश्रु तू ढालू नको

कुरुक्षेत्री अशी भावविभोर होवू नको

रणांगणी तुझ्या स्म्रुतिचा दीप एक तेवत राहिल

कधी न कधी इतरांना सुद्धा

तोच प्रकाश पुरवत राहिल...



सौ रेखा जगताप

Saturday, July 5, 2008

नको नको रे पावसा ...

असा बेभान तू होऊ

दूर गेली माझी माय

कशी येईल रे घरी

नको नको रे पावसा .....

डोळे असे रे वटारु

लखाखती दिव्य तारा

भय दाटले रे मनी

माय माझी ही गुणाची

रात दिस राबते ते ती

आम्हा मुलांचे रे सुख

दिन रात जपते ती

नको नको रे पावसा .....

असा बेभान तू होऊ

भरू आले रे आंगन

चहू दिशा झाले पाणी

झाला व्याकुळ हा जीव

माझ्या मायेच्या भेटीला

सानुला रे बंधू माझा

रडू रडून झोपला

नको नको रे पावसा ....

झाली असेल बेचैन माय माझी ही बर का

पिल्लांसाठीच तिचाही जीव सैरभैर झाला

थकु भागून माय ती घरी उशिरा येईल

डबाबल्या डोळ्यानी ती मला जवळ घेईल

मऊ मऊ दुधभात पाखरांना भरविल

मग मग रे पावसा खुपखूप रे कोसळ

माझ्या मायेच्या कुशीत सारे जग विसरिन...





रेखा जगताप
जुलाई ३, २००८
३:५० दुपारी

Sunday, June 22, 2008

निरोप

स्नें --स्नेहिल स्वभावाचा बापट बाईना निरोप देताना .........!

-- हळूवार कंठ दाटून येतो

-- लपवला कितीही तरी..... अश्रू एक ओघळतो

ता -- ताटातूटीचा हा निवृति सोहळा

बा -- बराचं काही सांगून जातो

-- परत जुन्या आठवणीना फिरून उजाळा देतो

-- टपटपणारया आसवांची .... हीच एक सदभावना


सुखी आनंदी शतायुषी ठेव

आमच्या बापट बाईना

आमच्या बापट बाईना .....

Saturday, June 21, 2008

सखे गं मैत्रिणी

सखे गं मैत्रिणी ...! सखे गं मैत्रिणी !


मैत्री ही आपली दोन वर्ष पुराणी


मैत्रित सहवास, सहवासात मैत्री


नव्हतो आपण काढत कुणाची उनिदुणी ॥!


सहवासचं सुख टिकत नाही म्हणतात ----


म्हनूणच------


आपलीच माणसं काडया घालणयाचं काम करतात


मैत्रित आपल्या प्रश्न ही (?) होते,


उत्तरं तर होतीच होती ...


पण ...


काही प्रश्न अनुत्तरित राहिले


आणि काही उत्तरं प्रश्नांकित ठरली


प्रश्नांची त्यांच्या आतुरता आहे....!


पुन्हा तुझ्या सहवासाची अजून ओढ आहे


मैत्री आपली जणू वळवाचं पानी


पण टिकवायची बरं का न विसरतेपनी


म्हणशील सखे, रेखा तू खरच घाटी ...!


पण आशु, झुरते तुझ्याच सहवासासाठी


तुझ्याच मैत्री साठी ....!



रेखा शिवाजी जगताप.

१ जुलाई १९९५.


सुनामी लहरे




दूर सागर से आयी एक लहर

दूर सागर से आयी एक लहर..!

छा गई धरती पर बनकर कहर .....!

मचा हाहाकार.... ! धरती डोली

मानव क्या चिडिया भी न बोली ॥!

एक थी लहर नाम था सुनामी

एक थी लहर नाम था सुनामी ....!

बनाकर कहर व्दिपो पर छाई

मानवता एक आँसू भी ना बहा पाई ...!

सुनामियोकी पीडा बना गई एक नासूर ... !

सोचा न था ...! मानवता होगी इतनी मजबूर ॥!

बचपन कितने बह गए ..!

आशाए कितनी ढह गई ...!

कुदरत का कहर फ़िर न आए कभी...!

हे मानवता॥! जाग जा अभी ...! जाग जा अभी॥!




रेखा जगताप
(sunamichya tisarya diwashi )

सख्या सत्यवान


सख्या सत्यवान

सख्या रे सत्यवान, तू किती भाग्यवान ..........!

सावित्रीच्या पायाखाली मात्र काटेरी रान,

काट्य़ाकुटयातून चालताना तिची होतेय वनवन,

रक्ताळतात पाय आणि ओथंबतं मन,

पुसायला अश्रु, नसतात तुझे हात,

विरहाच्या वेदनेने गलित होतात गात,

पाखरांचा टाहो घरट्याचा घाट

सावित्रीचे डोळे मात्र पहातात तुझी वाट ............!



रेखा जगताप
१८ जून २००८ ४.00 (वट पौर्णिमा)



Monday, June 16, 2008

जोडीदार


जोडीदार

जोडीदाराची निवड करावी म्हटलं आवडीनं


आणि जगावं जीवन गुलाबी गोडीनं

विसावलं मन जोडीदाराच्या छातीवर

जसं वळवाचं पाणी हिरव्या गार पातीवर

स्वच्छंदी जीवनाचं रहस्य उमगलं

संसाराच्या वेलीवर पहिलं फुल फुललं

दवाचे थेंब ओघळून गेले

हदयाची स्पदनं निमाऊन गेले

समज गैसमज ओढवू पाहतोय

जोडीदाराची जोड सोडवू पाहतोय

गुलाबी जोडीत तडजोड आली

जोडीदाराची फक्त जोड (?) उरली...



रेखा शिवाजी जगताप. (१९९५)