Sunday, July 6, 2008

निवृति

वीरांगने ! असे अश्रु तू ढाळू नको !

कुरुक्षेत्री तू अशी भावविभोर होऊ नको !

पेरलेल्या तुझा स्वरांचे प्रतिसाद उमटतिल वेळाने

अनुभवाचे बोल तुझे ठरतील प्रेरक जेत्याचे

गीतेचा उपदेश आमलात आणण्याचा

प्रयत्न तू केलास ....

पण .........

पण श्रीकृषणाचा मोलाचा सल्ला तेवढा विसरलात

सामंजस्य राखून टाळले असते संघर्ष

...तर कुरुक्षेत्राच युद्ध झालच नसतं

तुमच्या विचारांना सांगड़ घालून मोल त्याच वाढलं असतं

तरीही, वीरंगाने अश्रु तू ढालू नको

कुरुक्षेत्री अशी भावविभोर होवू नको

रणांगणी तुझ्या स्म्रुतिचा दीप एक तेवत राहिल

कधी न कधी इतरांना सुद्धा

तोच प्रकाश पुरवत राहिल...



सौ रेखा जगताप

No comments: